ई. स. १६५८ मध्ये औरंगजेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मोगल साम्राज्यात दोन गट पडले - एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगजेबाचा. अशी बंडाळी माजली असताना माहुरच्या राजे उदाजीराम (मृ.१६३२) यांचा मुलगा जगजीवनराव याने शहजहान बादशहास एक पत्र लिहिले. त्यात तो म्हणतो, " माझ्या शत्रूंचा माझ्या परिवारास संपवून टाकण्याचा कट आहे ". यावर शहजहानने ४ शाबान १०६८ हिजरी (ई. स. १६५७) रोजी जगजीवनरावाला उत्तर पाठवले, " तुझ्या परिवाराच्या संरक्षणासाठी बादशहाने सैन्य पाठविले आहे. तू आपल्या सैन्यासह बादशहाच्या दरबारात हजर व्हावे. " शहजहानचे सैन्य माहुरला पोहोचले की नाही हे कळत नाही. पुढच्या पत्रातील मजकुरातून शहजहानच्या भेटीला जगजीवनराव गेल्याचेही दिसत नाही. २९ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि दाराशुकोह यांच्यात सामुगढ येथे तुंबळ लढाई झाली. जगजीवनरावाने औरंगजेबाला सहाय्य केले. या लढाईत जगजीव...
वऱ्हाड म्हणजे विदर्भ नव्हे. वऱ्हाड हा आजच्या विदर्भातला पश्चिमेकडचा प्रदेश. वऱ्हाड चे इंग्रजी रूप बेरार (berar) . वऱ्हाड एकेकाळी समृद्ध होता. वऱ्हाडात जिजाबाईंचे माहेर आहे. राजे उदाराम आणि राजे लखुजी जाधवरावांची जहागीरी वऱ्हाडात होती. वऱ्हाडातील काही ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनावर अभ्यासपूर्ण लेख आपल्याला “वऱ्हाडनामा” येथे वाचायला मिळतील.