Skip to main content

Posts

वऱ्हाडातील संतपरंपरा २ - श्रीगजाननशिष्य भास्कर

          अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या पूर्वेस १२ किमीवर अडगांव बुद्रुक नावाचं गाव आहे. गेल्या शतकभरापासून वऱ्हाडच्या संतपरंपरेच्या इतिहासातील एक सोनेरी पान येथे विसावा घेते आहे. भास्कर महाराज हे सद्गुरू श्री गजानन महाराजांचे पट्टशिष्य. त्यामुळे या गुरुशिष्यांच्या उल्लेखावाचून वऱ्हाडच्या संतपरंपरेचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.  गजानन महाराज आणि योगमार्ग           ह्या लेखात काही विषयांवर चर्चा करत त्यांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. गजानन महाराजांच्या सान्निध्याचं गांभीर्य समजून घेण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. या हिंदुभूने हजारों वर्षे खत पाणी घालून वाढविलेल्या योगविज्ञानाच्या वृक्षाचे भास्कर महाराज हे एक फळ आहेत. या भूमीवर हजारो योगी होऊन गेले. त्यांनी कायम जनसामान्यांच्या आयुष्यात आध्यात्मिक ज्योत पेटविण्याचा प्रयत्न केला. मग ते आदियोगी शिव असोत, अगस्त्य मुनी असोत, भगवान श्रीकृष्ण असोत, गुरुदेव दत्त असोत, आदी शंकराचार्य असोत, भगवान बुद्ध असोत, भगवान महावीर असोत, श्रीपाद श्रीवल्लभ असोत, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या संतशृंखलेतील ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम महा
Recent posts

वऱ्हाडातील संतपरंपरा १ - मियाँसाहेब महाराज

🌸~~~वऱ्हाडातील संतपरंपरा !~~~🌸 “कुवतअलिशहा मियाँसाहेब उर्फ मियाँसाहेब महाराज” अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात, अकोट शहराच्या वायव्येस काही मैलांवर ‘उमरा’ नावाचे गाव आहे. तिथे संत कुवतअलिशहा मियांसाहेब यांची समाधी आहे. मियांसाहेब महाराज हे मूळचे पंजाबचे होते. इसवी सन १८५० च्या सुमारास ते उमरा येथे आले. ते महाराष्ट्रात कसे व का आले, याची इतिहासाला माहिती नाही. पण अकोटचे प्रसिद्ध संत नरसिंह महाराज तसेच दिवठाणा, अडगावचे संत एकनाथ महाराज यांचे ते गुरु होते. अकोट येथे दरवर्षी शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत नरसिंह महाराजांची यात्रा भरत असते. “लोकांना सर्वप्रथम मियाँसाहेब महाराज  कसे ज्ञात झाले ?” रात्रीच्या वेळी उमरा गावात एक अवलिया येऊन भिक्षा मागत असत. पण त्यांची भिक्षा मागायची पद्धत जरा निराळी होती. “हाजिर हूआ तो भेज ” असं मोठ्याने ओरडून ते ‘मी असेपर्यंत भिक्षा आणून दे’ अशी मागणी करीत असत. पूर्वी दारात आलेल्या प्रत्येक अतिथीचे यथातथ्य सोपस्कार करण्याची पद्धत असे. त्यामुळे लोक घाईघाईने त्यांच्यासाठी भिक्षा घेऊन जात. पण दारात पोहोचेपर्यंत ते महाराज तिथून निघून गेलेले असत. बरेच दिवस हे च

Shama Kolam : The Accidental Bandit

  Life of Shama Kolam : Part One                 Shama Kolam , famously known as Robinhood of Vidarbha , was born on 26 th November, 1899 in village of Niranjan Mahur in Nanded district in an aboriginal ‘Kolam tribe’. It is said that Kolams are Dravidian. Their language – Kolami- has resemblance with Dravidian languages. 1 Kolams are mostly populated in Yavatmal district of Maharashtra state. They are spread to the other adjacent districts of Nanded, Adilabad & Chandrapur. It is one of the most backward aboriginal communities of India. Though they have some cultural semblance with Gonds, they are different from Gonds in many aspects. There’s no caste hierarchy in Kolams. They are mostly divided by surnames which have been adopted from the names of villlages. 2                Shama was born in one of the poor families and brought up in the adjacent jungles of Mahur and Nanded. Short but stout and strongly built, Shama was polite in his conduct. He was illiterate and worked as a

“शामा कोलामचा रामराम पोहोचे”

भाग - २                  १ ९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला.                घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शामा स्वतः उनी- उमरी नावाच्या गावी जाऊन भिवरेचं लग्न ठरवून आला. काही दिवसात तिचं लग्न झालं.

विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम भाग - १

                १९३५-३६ साल होतं. घनदाट जंगल असल्यामुळे अनेक हौशी शिकारी माहूर परिसरात तयार झाले होते. अनेक लोक बाहेरून येत. शिकारीसाठी काही दिवस माहूर किंवा आजूबाजूच्या गावी येऊन राहत. राजे उदाराम घराण्याच्या माहूर शाखेकडे अजूनही माहूरची जहागीरदारी होती.¹ माहूरचा कारभार त्या काळी राजे व्यंकटराव देशमुख उर्फ भाऊसाहेब बघत. त्यांच्याकडे एक शिकारी कामाला होता. त्याचे नाव राजा - शिकारी राजा². राजाचाच जिगरी दोस्त होता ‘ शामा कोलाम’.                शामाचा जन्म २६ नोव्हेंबर, १८९९ साली आदिवासी कोलाम समाजात माहूर गावीच झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी भिवरा नावाच्या मुलीसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं दशरथ. शामा गावच्या पाटलाकडे गडी म्हणून कामाला होता. कधी कधी भाऊसाहेबांनी सांगितलेली कामे देखील तो करत असे. भाऊसाहेब स्वतः शिकारीला जात त्यावेळी राजा आणि शामा त्यांच्याबरोबरच असत. शामा उत्कृष्ठ नेमबाज होता.                भाऊसाहेबांनी घरी दोन वाघ पाळले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त राजा करत असे. एक दिवस राजा वाघांच्या पिंजऱ्यात झाडझुड करायला गेल्यावर अचानक वाघ

पहिला पराभव - भातवडीचे युद्ध

                ई. स. १६२४ मध्ये आदिलशाही आणि निजामशाही यांच्यातील वैमनस्य कळसाला पोहोचले होते. आपली ताकद वाढावी म्हणून दोघांनीही दख्खनचा मुघल सुबेदार ‘महाबतखान’ याची मदत घेण्याचा भरपूर प्रयत्न केला. दोन्ही शाह्यांनी मुघलांना सहाय्य देऊ करण्याचे आश्वासन दिले. मलिक अंबरने आपला दूत आली शेर, तर अली आदिलशहाने आपला मुख्य सरदार ‘मुल्ला मुहम्मद लारी’ यांना महाबतखानाकडे पाठवले. मलिक अंबर महाबतखानाच्या भेटीसाठी स्वतः देऊळगाव येथे येऊन राहिला. पण महाबतखनाने आदिलशहाशी तह केला आणि मलिक अंबरच्या प्रस्तावाला चूल दाखवली. मुघल आणि आदिलशाह यांच्यातील तहाने मलिकची झोप उडवून टाकली. ठरल्याप्रमाणे मुल्ला महम्मद लारीसोबत सोबत आदिलशाहने ५००० घोडदळ पाठवलं. मलिक अंबरने मध्येच लारीला गाठू नये म्हणून राजे लखुजी जाधवराव आणि राजे उदाराम यांना बालाघाट( माहूर पुसद घाट) येथे पाठवण्यात आले. मलिक अंबरने हवेची दिशा बघितली होती. येत्या काळात आदिलशाही आणि मुघल दोन्ही फौजांशी एकाच वेळी लढावे लागणार आहे याचा त्याने अंदाज बांधला होता. त्याने निजामशहाला खडकीहून ( आजचे औरंगाबाद) देवगिरी किल्ल्यावर नेऊन ठेवलं खडकी शहर रिकामं के

जाधवांचिये नगरी

(१९४७ साली ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. य. खू. देशपांडे यांनी सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. तेव्हा त्यांनी “जाधवांचिये नगरी” या आपल्या लेखात सिंदखेड येथील ऐतिहासिक वास्तूंची माहिती आणि परिस्थिती लिहून ठेवलेली आहे. त्याच लेखातील निवडक भाग खाली देत आहे. सदर लेखात दिलेल्या सिंदखेडच्या परिस्थितीत आजही विशेष काही बदल झालेला नाही. रंगमहाल आणि निळकंठेश्र्वर मंदिर (प्राचीन) ह्या वस्तू अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. नीळकंठेश्र्वर मंदिराच्या परिसरात दारूच्या फुटलेल्या बाटल्या बघायला मिळतात. तसेच मंदिराच्या आत जंगली गवत उगवल्याचे लक्षात येते. आसपासच्या भागात अनेक देवीदेवतांच्या प्राचीन मूर्ती ऊन वारा पाऊस यांचा मार खाण्यासाठी सोडून दिलेल्या आढळतात.) जाधवांचिये नगरी :                 लखुजी जाधवांना शिंदखेडची देशमुखी मिळाल्यानंतरचे अनेक अवशेष सिंदखेड येथे आणि देऊळगावराजा येथे आहेत. शिंदखेडास सिद्धक्षेत्र म्हणत असत, असे गोसावीनंदन यांच्या ज्ञानमोदक ग्रंथावरून दिसते. क्षेत्र म्हणून अद्यापही त्याची प्रसिद्धी आहे. लखुजी जाधवांच्याही अगोदरचे अवशेष म्हणजे नीळकंठेश्वर महादेवाचे मं

राजे जगदेवराव जाधव यांची दिनचर्या

राजे जगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ              वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. श्रीशिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ. स. १५७५ च्या सुमारास संपादन केली. मोगल दरबारातून त्यांना १२००० फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते. याशिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते. त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले. प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी, त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरीलप्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजेसह नेमले होते. कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता, विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला. मोठे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात त्यांना यश आले तरी स्वत