Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

जाधवांचिये नगरी

(१९४७ साली ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. य. खू. देशपांडे यांनी सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा या ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. तेव्हा त्यांनी “जाधवांचिये नगरी” या आपल्या लेखात सिंदखेड येथील ऐतिहासिक वास्तूंची माहिती आणि परिस्थिती लिहून ठेवलेली आहे. त्याच लेखातील निवडक भाग खाली देत आहे. सदर लेखात दिलेल्या सिंदखेडच्या परिस्थितीत आजही विशेष काही बदल झालेला नाही. रंगमहाल आणि निळकंठेश्र्वर मंदिर (प्राचीन) ह्या वस्तू अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. नीळकंठेश्र्वर मंदिराच्या परिसरात दारूच्या फुटलेल्या बाटल्या बघायला मिळतात. तसेच मंदिराच्या आत जंगली गवत उगवल्याचे लक्षात येते. आसपासच्या भागात अनेक देवीदेवतांच्या प्राचीन मूर्ती ऊन वारा पाऊस यांचा मार खाण्यासाठी सोडून दिलेल्या आढळतात.) जाधवांचिये नगरी :                 लखुजी जाधवांना शिंदखेडची देशमुखी मिळाल्यानंतरचे अनेक अवशेष सिंदखेड येथे आणि देऊळगावराजा येथे आहेत. शिंदखेडास सिद्धक्षेत्र म्हणत असत, असे गोसावीनंदन यांच्या ज्ञानमोदक ग्रंथावरून दिसते. क्षेत्र म्हणून अद्यापही त्याची प्रसिद्धी आहे. लखुजी जाधवांच्याही अगोदरचे अवशेष म्हणजे नीळकंठेश्वर महादेवाचे मं

राजे जगदेवराव जाधव यांची दिनचर्या

राजे जगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ              वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. श्रीशिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ. स. १५७५ च्या सुमारास संपादन केली. मोगल दरबारातून त्यांना १२००० फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते. याशिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते. त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले. प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी, त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरीलप्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजेसह नेमले होते. कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता, विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला. मोठे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात त्यांना यश आले तरी स्वत