Skip to main content

कोण होती रायबागन?


     
“माहूरचा रामगड किल्ला”



       ई. स. १६५८ मध्ये औरंगझेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मुघल साम्राज्यात दोन गट पडले, एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगझेबाचा. औरंगझेबाच्या बाजूने माहूरच्या राजे  उदाराम यांचा मुलगा जगजीवनराव लढत होता. आग्र्याजवळ समुगढ येथे  दारा आणि औरंगझेब यांच्यात निर्णायक लढाई झाली. या लढाईत जगजीवनराव मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याचे नेतृत्व एका स्त्रीने केले. सैन्यात लढणाऱ्या एकमेव स्त्रीला औरंगझेबाने बघितले असावे. तिच्या असामान्य शौर्याने तो प्रभावित झाला.  त्या लढाईत औरंगझेबाचा विजय झाला. त्या लढणाऱ्या स्त्रीचा लौकिक सर्वत्र पसरला होता. औरंगझेबाने रीतसर गादीवर स्वतःला बसवून घेतल्यानंतर त्या स्त्रीस बोलाविण्याची आज्ञा केली. त्या प्रमाणे ती स्त्री दरबारात हजर झाली. ज्ञात झाले की ती माहूरचे मुघल सरदार राजे उदाजी राम यांची पत्नी आहे. तिचे नाव सावित्रीबाई. डोळ्यासमोर पोटच्या मुलाचा मृत्यू झालेला बघून देखील खचून न जाता ती प्राणपणाने लढली होती. औरंगझेबाने तिला “रायबागन” हा खिताब बहाल केला. रायबागन चे संस्कृत रूप म्हणजे राजव्याघ्री ( राज्याची वाघीण ). कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत या ग्रंथात तिचा याच नावाने उल्लेख केलेला आहे.
        ई.स. १५९५ मध्ये जेव्हा अकबराने माहूर किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा तेथे इंद्रजीव नावाचा राजपूत जमीनदार होता. अकबराने त्याच्याकडून किल्लेदारी तसेच जहागीर काढून ती राजे उदाराम यांना दिली होती. हरचंदराय इंद्रजीवच्या कुळातला असावा. राजे उदाराम यांच्या मृत्यूनंतर सावित्रीबाईने अल्पवयीन जगजीवनरावच्या नावाने शहाजहान कडून जहागीर मिळवून घेतली होती. त्या जहागिरीसाठी हरचंदरायाने माहूरवर आक्रमण केले, तेव्हा त्याला सावित्रीबाईने प्रतिकार केला. आपल्या भाल्याला चोळी बांधून  ती लढण्यास सज्ज झाली. तिने तिच्या सैन्याला लढण्याचे आवाहन केले. “तुमच्या बहिणीची लाज राखा !” असे म्हणून तिने तिच्या सैन्याला उत्तेजीत केले. लढाई झाली, त्यात सावित्रीबाई स्वतः लढली आणि तिने हरचंदरायाचा पराभव केला. ही घटना ई. स.१६३२ ते ई. स. १६३७ दरम्यान घडली. या घटनेमुळे सावित्रीबाईंच्या शौऱ्याची खबर साऱ्या साम्राज्यात पसरली. जगजीवनच्या मृत्यूनंतर आपला नातू बाबुराव ह्यास हाताशी धरून ती जहागीर सांभाळू लागली.
        औरंगझेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास दख्खनचा सुबेदार नेमले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असता त्याने पुणे, सुपे , चाकण, इंदापूर वगैरे परगणे काबीज केले.  यावेळी शाहिस्तेखानाला सहाय्य करण्यासाठी रायबागनला पुण्याला पाठविण्यात आले. शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून आले. त्यानंतर शाहिस्तेखानाने कहारतलब खानासोबत रायबागन हीस नेमले आणि चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल काबीज करण्यास मोठ्या फौजेनिशी त्यांना पाठवले. २ फेब्रुवारी, १६६१ ला  उंबरखिंडीत मुघली सैन्याला गाठून तिचा मराठ्यांनी धुव्वा उडविला. लढण्यात काहीही अर्थ नाही हे जाणून रायबागन ने काहारतलबास शिवाजीस शरण जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ती काहारतलबास म्हणाली, “ शिवाजीरुपी सिंहाच्या आश्रयाखाली असलेल्या वनात सैन्यासह प्रवेश केलास हे तू वाईट काम केलेस. दिल्लीपती चे सैन्य तू तुझ्या गर्विष्ठाने सिंहाच्या जबड्यात आणून सोडले ही दुःखाची गोष्ट होय. आजपर्यंत दिल्लीपती ने जे काही यश मिळविले ते सारे तू ह्या अरण्यात बुडविले ! पहा ! मागे व पुढे, उजवीकडे व डावीकडे उभे असलेले शत्रू आनंदाने लढू इच्छित आहेत. हे पटाईत असलेले तिरंदाज तुझे सर्व सैनिक चित्रातील मनुष्यांप्रमाणे अगदी स्तब्ध आहेत. खेदाची गोष्ट ही की दिल्लीपतीच्या त्या मूर्ख सेनापती शाहिस्तेखानाने शत्रूच्या प्रतापरुपी अग्निमध्ये तुला सैन्यासह टाकले. शत्रू तुला ताबडतोब जिवंत पकडून नेऊ इच्छित आहे, तू मात्र कोंडला गेला असून आंधळ्या प्रमाणे युद्ध करू इच्छित आहेस. फलनिष्पत्ती होत असेल तरच पुरुषाच्या उद्योगाचा या जगात उपयोग, नाहीतर तेच साहसाचे कृत्य खरोखर उपहासास कारणीभूत ठरते. म्हणून तू लगेच त्या राजास शरण जाऊन आपणास सैन्यासह मृत्युपाशातून सोडीव.” तिचा सल्ला ऐकून काहारतलब खानाने शिवाजी महाराजांकडे दुत पाठविला, खंडणी दिली, क्षमा मागितली आणि आपली सुटका करून घेतली. पुढे काही दिवसांत ई. स. १६६३ मध्ये महाराजांनी लाल महालावर हल्ला केला. त्या प्रसंगी शाहिस्तेखानाची बोटे कापली. तीन महिन्यांनंतर खान पुणे सोडून गेला. त्याला बंगालला पाठविण्यात आले.रायबागनला मराठ्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी पुणे प्रदेशातच नेमण्यात आले.
         ई.स. १६६४ साली महाराजांनी पहिल्यांदा सुरत लुटली. त्यावेळी रायबागनच्या सैन्यात आणि मराठ्यांच्यात चकमक झाली. तीत रायबागनचा पराभव झाला. तिला कैद करण्यात आले. शिवाजी महाराजांनी तिला मनसबदाराचा मान देऊन गौरव करून परत पाठवून दिले.  तथापि सुरत लुटीच्या कथेला सबळ पुरावा नाही. त्यामुळे यात इतिहासकारांचे दुमत आहे असे दिसते.

(राजे उदाराम हे मध्ययुगीन भारताच्या राजकारणातील आणि मुख्यतः महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्वपूर्ण सरदारांपैकी एक होते. राजे उदाराम उर्फ उद्धवजी रामजी हे सतराव्या शतकाच्या पहिल्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वपूर्ण सरदार म्हणून नावारूपास आले. राजे उदाराम हे नावच या घरण्याची ओळख झाली. राजे उदाराम यांचा प्रत्येक वंशज हे नाव आपल्या नावसमोर लावू लागला. त्यामुळे या घराण्याच्या कागदपत्रांमध्ये सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते अगदी विसाव्या शतकापर्यंत फक्त राजे उदाराम एवढेच नाव दिसते. यामुळे इतिहास अभ्यासकांचा घोळ होऊन रायबागण सावित्रीबाई हिला त्यांनी राजे उदाराम उर्फ उद्धवजी रामजी यांचीच पत्नी मानले. हाच घोळ पूर्णपणे सबळ पुरावा मिळेपर्यंत आम्ही पुढे चलवण्याचे ठरवले. सावित्रीबाई ही राजे उदाराम यांची सून की पत्नी याचा सबळ पुरावा मिळताच तसा एक लेख प्रसृत करण्यात येईल.

त्याचबरोबर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार रायबागिण ही समुगढच्या युद्धात लढत होती असे एका दुय्यम पुराव्यावरून आपल्याला कळले होते. आता अवरंगझेबाचे एक पत्र अस्तित्त्वात असल्याचे कळले, ज्यात अवरंगझेबाने सावित्रीबाईला जगजीवन मारला गेल्याची बातमी कळवली आहे. तरीही प्राथमिक पुरावा मिळेपर्यंत यासंबंधी कुठलीही ठोस मांडणी करता येणार नाही.)


संदर्भ सूची :
१. कवींद्र परमानंद कृत शिवभारत
२. Indian historical records commission, Vol. XIV


© Copyrights reserved.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम भाग - १

                १९३५-३६ साल होतं. घनदाट जंगल असल्यामुळे अनेक हौशी शिकारी माहूर परिसरात तयार झाले होते. अनेक लोक बाहेरून येत. शिकारीसाठी काही दिवस माहूर किंवा आजूबाजूच्या गावी येऊन राहत. राजे उदाराम घराण्याच्या माहूर शाखेकडे अजूनही माहूरची जहागीरदारी होती.¹ माहूरचा कारभार त्या काळी राजे व्यंकटराव देशमुख उर्फ भाऊसाहेब बघत. त्यांच्याकडे एक शिकारी कामाला होता. त्याचे नाव राजा - शिकारी राजा². राजाचाच जिगरी दोस्त होता ‘ शामा कोलाम’.                शामाचा जन्म २६ नोव्हेंबर, १८९९ साली आदिवासी कोलाम समाजात माहूर गावीच झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी भिवरा नावाच्या मुलीसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं दशरथ. शामा गावच्या पाटलाकडे गडी म्हणून कामाला होता. कधी कधी भाऊसाहेबांनी सांगितलेली कामे देखील तो करत असे. भाऊसाहेब स्वतः शिकारीला जात त्यावेळी राजा आणि शामा त्यांच्याबरोबरच असत. शामा उत्कृष्ठ नेमबाज होता.                भाऊसाहेबांनी घरी दोन वाघ पाळले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त राजा करत असे. एक दिवस राजा वाघांच्या पिंजऱ्यात झाडझुड करायला गेल्यावर अचानक वाघ

मुघलांपूर्वीचे वऱ्हाड

        १५ व्या शतकात दक्षिण भारतातली बहामनी सल्तनत कोसळल्यावर त्यातून ५ छोटी छोटी राज्ये उभी राहिली. अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३७), गोवळकोंड्याची कुतुबशाही(१५१८-१६८६), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६८६), बिदरची बरिदशाही(१५२६-१६१९) आणि वऱ्हाडची इमादशाही(१४८४-१५७४).  ई. स. १५७४ मध्ये मूर्तजा निजामशाह ने वऱ्हाड प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडून घेतला. आणि इमादशाही संपुष्टात आली. पण निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे फार काळ निजामशाहीचा वऱ्हाडात अंमल राहू शकला नाही. मुर्तजा निजामशाह पहिला याच्या मृत्यूनंतर इब्राहिम निजामशाह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर निजामशाहीतल्या ४ अमीरांनी ४ दिशांना तोंडे फिरवली. प्रत्येकाने एकेक गादीचा दावेदार निवडला आणि ते आपसांत लढू लागले. त्यातला मियां मंझु नावाचा सरदार इखलास खानाविरुद्ध लढत असता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला, तेव्हा त्याने गुजरातेत स्थित मुघल बादशाह अकबराचा पुत्र शाहजादा मुराद, याची मदत मागितली. मुराद दख्खनच्या राजकारणावर नजर ठेऊन होता आणि योग्य संधी मिळण्याची वाट बघत होता. आता त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने अकबराचा कौल घेतला आणि  आपल्य

सिंदखेडचे जाधवराव

राजे लखुजी जाधवराव          सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवराव यांच्या आश्रयाला गेली. जाध

माहूरचे राजे उदाराम

“माहूर येथील हत्तीखाना”                 मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या राजे उद्धवजी रामजी उर्फ राजे उदाराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उद्धवजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्षण घेतले असावे.  काही काळातच त्यांनी एक

दख्खनचे राजकारण : ई. स. १६१६ ते १६२१

          ई. स. १६१६ च्या रोशनगावच्या लढाईत† सपाटून मार खाल्ल्यानंतर मलिक अंबरने आपले गमावलेले मराठा सरदार परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला. त्यात वर्षभरात त्याला यश मिळालं. लखुजीराजे, उदाराम पंडित आणि बाबाजी कायथ यांनी मुघल छावणी सोडून निजामशाहीत पुनः प्रवेश केला. पण काही काळातच मलिक अंबर आणि मराठ्यांच्या ह्या गटातील मतभेद पुन्हा वर येऊ लागले. मलिक अंबरने बाबाजी कायथची कपटाने हत्या करवली. आणि राजे उदाराम यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले. उदारामांनी त्या सैन्याचा पराभव केला. आणि निजामशाही मुलुखात धोका असल्याचे जाणून आदिलशहाशी पत्रव्यवहार सुरू केला. पण मलिक अंबर आणि आदिलशहाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आदिलशाही दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. अखेर मुघल सुभेदार खान खानान याच्याशी बोलणी करून उदाराम मुघल छावणीत दाखल झाले.           इकडे रोशनगावची लढाई संपते न संपते तोच जहाँगीर बादशहाने आपला मुलगा खूर्रम याला दक्षिणेत पाठवले. १६ ऑक्टोबर १६१६ रोजी शहजादा खुर्रम अजमेर हून निघाला आणि  ई. स. १६१७ च्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरात येऊन दाखल झाला. बुऱ्हाणपूरला पोहोचताच त्याने मलिक अंबर विरुद्ध

Shama Kolam : The Accidental Bandit

  Life of Shama Kolam : Part One                 Shama Kolam , famously known as Robinhood of Vidarbha , was born on 26 th November, 1899 in village of Niranjan Mahur in Nanded district in an aboriginal ‘Kolam tribe’. It is said that Kolams are Dravidian. Their language – Kolami- has resemblance with Dravidian languages. 1 Kolams are mostly populated in Yavatmal district of Maharashtra state. They are spread to the other adjacent districts of Nanded, Adilabad & Chandrapur. It is one of the most backward aboriginal communities of India. Though they have some cultural semblance with Gonds, they are different from Gonds in many aspects. There’s no caste hierarchy in Kolams. They are mostly divided by surnames which have been adopted from the names of villlages. 2                Shama was born in one of the poor families and brought up in the adjacent jungles of Mahur and Nanded. Short but stout and strongly built, Shama was polite in his conduct. He was illiterate and worked as a

मराठ्यांचे महत्त्व १ : मलिक अंबर !

 देवगिरी किल्ल्याचे भग्नावशेष          मलिक अंबराच्या कारकिर्दीतील निजामशाहीचा इतिहास म्हणजे मुघल आणि दख्खनी शाह्या यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. मलिक अंबराने निझाम, आदिल, कुतुब या तिन्ही शह्यांना एकत्र आणून मुघलांना जवळजवळ वीस वर्ष दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरलं. गनिमी कावा युद्धतंत्राने त्याने मुघली फौजांना हैराण करून सोडलं. आणि त्यात त्याला सगळ्यात जास्त मदत झाली ती मराठ्यांच्या चपळ सैन्याची. ह्या कारणामुळे अंबराच्या कार्यकाळात मराठ्यांचा उदय झाला. पण याचा अर्थ मलिक अंबराचे मराठ्यांवर काही विशेष उपकार आहेत असा होत नाही.            ई. स. १६०७ मध्ये मलिक अंबराने राजू दख्खनीला कैद करून त्याच्या अखत्यारीतला मुलुख निजामशाही राज्याला जोडला आणि संपूर्ण निजामशाही सत्ता आपल्या वर्चस्वाखाली आणली. पुढे मुर्तझा निझामशाह दुसरा याच्याशी असलेले मतभेद संपवून त्याने आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. तोपर्यंत मुघलांनी अहमदनगर आणि बराच निजामशाहीचा मुलुख काबीज केला होता. ई. स. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला, पण सुरूवातीची काही वर्षे तो शाहजादा खुसरौच्या बंडामुळे आणि पर्शिय

राजे जगदेवराव जाधव यांची दिनचर्या

राजे जगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ              वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. श्रीशिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ. स. १५७५ च्या सुमारास संपादन केली. मोगल दरबारातून त्यांना १२००० फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते. याशिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते. त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले. प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी, त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरीलप्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजेसह नेमले होते. कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता, विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला. मोठे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात त्यांना यश आले तरी स्वत

“शामा कोलामचा रामराम पोहोचे”

भाग - २                  १ ९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला.                घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शामा स्वतः उनी- उमरी नावाच्या गावी जाऊन भिवरेचं लग्न ठरवून आला. काही दिवसात तिचं लग्न झालं.