Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

“शामा कोलामचा रामराम पोहोचे”

भाग - २                  १ ९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला.                घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शामा स्वतः उनी- उमरी नावाच्या गावी जाऊन भिवरेचं लग्न ठरवून आला. काही दिवसात तिचं लग्न झालं.

विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम भाग - १

                १९३५-३६ साल होतं. घनदाट जंगल असल्यामुळे अनेक हौशी शिकारी माहूर परिसरात तयार झाले होते. अनेक लोक बाहेरून येत. शिकारीसाठी काही दिवस माहूर किंवा आजूबाजूच्या गावी येऊन राहत. राजे उदाराम घराण्याच्या माहूर शाखेकडे अजूनही माहूरची जहागीरदारी होती.¹ माहूरचा कारभार त्या काळी राजे व्यंकटराव देशमुख उर्फ भाऊसाहेब बघत. त्यांच्याकडे एक शिकारी कामाला होता. त्याचे नाव राजा - शिकारी राजा². राजाचाच जिगरी दोस्त होता ‘ शामा कोलाम’.                शामाचा जन्म २६ नोव्हेंबर, १८९९ साली आदिवासी कोलाम समाजात माहूर गावीच झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी भिवरा नावाच्या मुलीसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं दशरथ. शामा गावच्या पाटलाकडे गडी म्हणून कामाला होता. कधी कधी भाऊसाहेबांनी सांगितलेली कामे देखील तो करत असे. भाऊसाहेब स्वतः शिकारीला जात त्यावेळी राजा आणि शामा त्यांच्याबरोबरच असत. शामा उत्कृष्ठ नेमबाज होता.                भाऊसाहेबांनी घरी दोन वाघ पाळले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त राजा करत असे. एक दिवस राजा वाघांच्या पिंजऱ्यात झाडझुड करायला गेल्यावर अचानक वाघ