Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

सिंदखेडचे जाधवराव

राजे लखुजी जाधवराव          सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवराव यांच्या आश्रयाला गेली. जाध

मुघलांपूर्वीचे वऱ्हाड

        १५ व्या शतकात दक्षिण भारतातली बहामनी सल्तनत कोसळल्यावर त्यातून ५ छोटी छोटी राज्ये उभी राहिली. अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३७), गोवळकोंड्याची कुतुबशाही(१५१८-१६८६), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६८६), बिदरची बरिदशाही(१५२६-१६१९) आणि वऱ्हाडची इमादशाही(१४८४-१५७४).  ई. स. १५७४ मध्ये मूर्तजा निजामशाह ने वऱ्हाड प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडून घेतला. आणि इमादशाही संपुष्टात आली. पण निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे फार काळ निजामशाहीचा वऱ्हाडात अंमल राहू शकला नाही. मुर्तजा निजामशाह पहिला याच्या मृत्यूनंतर इब्राहिम निजामशाह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर निजामशाहीतल्या ४ अमीरांनी ४ दिशांना तोंडे फिरवली. प्रत्येकाने एकेक गादीचा दावेदार निवडला आणि ते आपसांत लढू लागले. त्यातला मियां मंझु नावाचा सरदार इखलास खानाविरुद्ध लढत असता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला, तेव्हा त्याने गुजरातेत स्थित मुघल बादशाह अकबराचा पुत्र शाहजादा मुराद, याची मदत मागितली. मुराद दख्खनच्या राजकारणावर नजर ठेऊन होता आणि योग्य संधी मिळण्याची वाट बघत होता. आता त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने अकबराचा कौल घेतला आणि  आपल्य

कोण होती रायबागन?

      “माहूरचा रामगड किल्ला”        ई. स. १६५८ मध्ये औरंगझेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मुघल साम्राज्यात दोन गट पडले, एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगझेबाचा. औरंगझेबाच्या बाजूने माहूरच्या राजे  उदाराम यांचा मुलगा जगजीवनराव लढत होता. आग्र्याजवळ समुगढ येथे  दारा आणि औरंगझेब यांच्यात निर्णायक लढाई झाली. या लढाईत जगजीवनराव मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याचे नेतृत्व एका स्त्रीने केले. सैन्यात लढणाऱ्या एकमेव स्त्रीला औरंगझेबाने बघितले असावे. तिच्या असामान्य शौर्याने तो प्रभावित झाला.  त्या लढाईत औरंगझेबाचा विजय झाला. त्या लढणाऱ्या स्त्रीचा लौकिक सर्वत्र पसरला होता. औरंगझेबाने रीतसर गादीवर स्वतःला बसवून घेतल्यानंतर त्या स्त्रीस बोलाविण्याची आज्ञा केली. त्या प्रमाणे ती स्त्री दरबारात हजर झाली. ज्ञात झाले की ती माहूरचे मुघल सरदार राजे उदाजी राम यांची पत्नी आहे. तिचे नाव सावित्रीबाई. डोळ्यासमोर पोटच्या मुलाचा मृत्यू झालेला बघून देखील खचून न जाता ती प्राणपणाने लढली होती. औरंगझेबाने तिला “रायबागन” हा खिताब बहाल केला. रायबाग