Skip to main content

विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम भाग - १


                १९३५-३६ साल होतं. घनदाट जंगल असल्यामुळे अनेक हौशी शिकारी माहूर परिसरात तयार झाले होते. अनेक लोक बाहेरून येत. शिकारीसाठी काही दिवस माहूर किंवा आजूबाजूच्या गावी येऊन राहत. राजे उदाराम घराण्याच्या माहूर शाखेकडे अजूनही माहूरची जहागीरदारी होती.¹ माहूरचा कारभार त्या काळी राजे व्यंकटराव देशमुख उर्फ भाऊसाहेब बघत. त्यांच्याकडे एक शिकारी कामाला होता. त्याचे नाव राजा - शिकारी राजा². राजाचाच जिगरी दोस्त होता ‘ शामा कोलाम’.

               शामाचा जन्म २६ नोव्हेंबर, १८९९ साली आदिवासी कोलाम समाजात माहूर गावीच झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी भिवरा नावाच्या मुलीसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं दशरथ. शामा गावच्या पाटलाकडे गडी म्हणून कामाला होता. कधी कधी भाऊसाहेबांनी सांगितलेली कामे देखील तो करत असे. भाऊसाहेब स्वतः शिकारीला जात त्यावेळी राजा आणि शामा त्यांच्याबरोबरच असत. शामा उत्कृष्ठ नेमबाज होता.

               भाऊसाहेबांनी घरी दोन वाघ पाळले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त राजा करत असे. एक दिवस राजा वाघांच्या पिंजऱ्यात झाडझुड करायला गेल्यावर अचानक वाघाने त्याच्यावर झडप घातली, ज्यात त्याला भारी जखम झाली. काही महिने त्याला अकोला येथे दवाखान्यात भरती करण्यात आलं. तिथे तो काँग्रेसच्या नेत्यांच्या भाषणाला हजेरी लावायला लागला. राजा परत माहूरला आला तो डोक्यात ब्रिटिशांप्रती राग आणि हृदयात स्वातंत्र्याची आग घेऊन. 

               एक दिवस शामाला घरी बोलवायला चंदन नावाचा त्याचा मित्र आला. भाऊसाहेबांच्या सांगण्यावरून राजाबरोबर शिकारीला जायचं होतं. सोबत होता पुसदचा महम्मद हुसैन. चौघे - राजा, शामा, चंदन आणि महम्मद हुसैन - शिकारीसाठी निघाले. दिवसभर फिरून देखील त्यांना मनाला भावेल तशी शिकार भेटली नाही. माहूर जवळच धनोडा नावाचे गाव आहे. महम्मद म्हणाला, “ तिथला सावकार माझा मित्र आहे, त्याच्या घरी चहा घेऊ.” सगळे राजी झाले. राजा आणि महम्मद यांच्यात आपसात काहीतरी कुजबुज सुरू होती. शामाने त्याकडे दुर्लक्ष केलं. सावकाराच्या घरी पोहोचताच महम्मदने कडी वाजवली. दरवाजा सावकारानेच उघडला. दरवाजा उघडताच महंमदने त्याच्या छातीवर बंदुकीची नळी ठेवली अन् ट्रिगर दाबला. मोठ्ठा आवाज झाला आणि काही कळायच्या आतच सावकार जमिनीवर कोसळला. त्याला मारताच महम्मद, राजा अन् चंदन तिघेही गावातून पळून जाऊ लागले. शामाला काही सुचेना. थोड्या वेळाने तोही त्यांच्या मागे पळत गेला. अंधार पडत आला होता. सगळीकडे बातमी पसरली होती. शामावर नसती बिलामत आली होती. ते सगळे तसेच आपापल्या घरी गेले. महंमद पुसदला निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शामाला पोलिसांनी अटक केली. राजा आणि चंदन फरार होते. शामाला भाऊसाहेबांच्या वाड्यावर नेण्यात आलं. पोलिस भाऊसाहेबांशी काहीतरी बोलत होते. थोडी विचारपूस झाली. पोलिसांनी भाऊसाहेबांच्या सांगण्यावरून शामाला त्यांच्याच वाड्यात ठेवलं आणि ते राजा- चंदनच्या शोधात निघून गेले.

               भाऊसाहेबांनी राजा आणि चंदनला आपल्या वाड्यातच लपवून ठेवलं होतं. तिघांची परत भेट झाली. भाऊसाहेबांनी तिघांना ‘ स्वतःला पोलिसांच्या हवाली करा. मी तुमची सुटका करवतो.’ असं आश्वासन दिलं आणि ते निघून गेले. राजाला साहजिकच पोलीसांना शरण जाऊन त्यांच्या दयेखाली सुटण्यात काहीच रस नव्हता. त्याने दोघांनाही  फरार होण्यासाठी प्रवृत्त केलं. शामाची आणि राजाची अगदी लहानपणापासूनच घट्ट मैत्री होती. शामाच्या मनात काय आलं असेल त्यालाच ठाऊक, त्यानेही होकार दिला. हा निर्णय घेतल्यावर पुढचं आयुष्य फरार जगायचं होतं, जंगलाने राहायचं होतं. तरीही त्याची फिकीर न करता तिघांनी आपापल्या घरी शेवटची भेट देण्याचा निर्णय घेतला. घरून थेट मातृतीर्थावर भेटण्याचं ठरलं. तिघही मध्यरात्रीनंतर वाड्यातून पसार झाले. शामा घरी गेला. आपल्या दोन भावांना आणि आईला त्याने आपला निर्णय कळवला. सगळे आधीच काळजीत होते. आता घरात रडारड सुरू झाली. शामानं सगळ्यांचं सांत्वन केलं. भाऊ पूनाजी आणि गणपत कोलाम यांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावून द्यायला सांगितलं. “दसरथले अंतर द्यू नोका. आता माह्यं काय होईन काई सांगता येत नाही. पर ही काई आपली शेवटचीच भेट नाही, हे खरं.” असं बोलून तो घरादाराचा त्याग करून निघुन गेला. गावात पोलीस तैनात होते. मुख्यतः चंदन आणि राजाच्या घराजवळच. तिकडे एका पोलिसाने राजाला अडवलं. दोघांत झटापट झाली. राजाने त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. गोळीच्या आवाजाने सगळं गाव जागं झालं. तिघेही मातृतीर्थापाशी भेटले. शामाला राजाची वागणूक पसंत पडली नाही. पोलिसाला मारल्याने आता आपण पक्के गुन्हेगार झालो आहोत याची त्याला जाणीव झाली होती. पण राजाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होतं...

               गावातून पळ काढल्यावर ते कधी आजूबाजूच्या जंगलात तर कधी माहूरच्या किल्ल्यावर दिवस काढू लागले. गावातून जेवणाचा आणि दारूचा पुरवठा होत असे. पण हा पुरवठा अखंड चालणार नव्हता. सध्या आयुष्य फक्त फराराचं होतं. रोज काहीतरी शिकार करून खायचं आणि दिवस काढायचे. पोलिस मागोवा घेत आले की दुसरीकडे जाऊन लपायचं, हेच सुरू होतं. चंदन एक दिवस माहूर गावात गेला आणि परत आलाच नाही. त्याला भाऊसाहेबांनी वाड्यावर बोलावून पोलीसांना शरण जाण्यासाठी सांगितलं असावं. दोन दिवसांनी तो आर्णीच्या पोलीस ठाण्यात हजर झाला.

               सहा सात महिने असेच गेले. गावात एक कुंदनसिंग नावाचा माणूस होता. कुंदनसिंग आणि त्याचा सावत्र भाऊ यांच्यात प्रॉपर्टी वरून वाद सुरू होता. त्यात तहसीलदाराने कुंदनसिंगचा वाडा ताब्यात घेतला. स्वतः तहसीलदार तिथे राहत असे. तहसीलदार वाडा रिकामा करून देईना. कुंदन सिंग एक दिवस शामा आणि राजाला भेटायला आला. त्याने त्यांना तहसीलदाराच्या खुनाची सुपारी दिली. राजाने होकार दिला. पण शामाने त्याला तसं काही करू दिलं नाही. एक दिवस रागारागात कुंदनसिंगनेच तहसीलदाराचा खून केला. आणि त्यांच्यासोबत राहायला आला. गावातील काही मुलं या तिघांना मदत करत. खाण्यापिण्याचं सामान, दारू, बोकडं, यांचा पुरवठा करत असत. ते तिघेही यांच्यासोबतच राहू लागले. आता ही पूर्ण सहा जणांची - वाघ्या, शिवर्या, रज्जाक, शामा, राजा, आणि कुंदनसिंग - टोळीच झाली होती.

               राजा आणि कुंदनसिंग यांनी आजूबाजूच्या गावातील लोकांकडून हफ्ता वसूली करण्याचं ठरवलं. डाकूच बनायचं त्यांचं ठरलं होतं. शामाने त्याचा विरोध केला. शामा म्हणे ‘फक्त सावकारांकडून पैसे गोळा करू. गरिबांना सोडून देऊ.’ हा शामाचा हट्ट होता आणि कुंदनसिंग मानेना. शेवटी शामानं त्यांच्यापासून वेगळं राहायचं ठरवलं. आणि एके रात्री तो निघून गेला. अधूनमधून जंगलाने त्यांची नजरभेट होत असे. पण कोणीच कोणाशी बोलत नसे. असेच काही दिवस गेल्यावर राजा त्याला भेटायला आला आणि आपल्याबरोबर येण्यासाठी आर्जव करू लागला. शेवटी शामा राजी झाला, पण सशर्त. शर्त ही होती, की गावागावात जाऊन वसूली करताना शामा वसूली करणार नाही, बाकीच्यांनी करायची. शामा त्यांच्या पासून काही अंतरावर जाऊन उभा राहील. सगळ्या शर्ती मान्य करून शामाला राजा आपल्या बरोबर घेऊन आला.

               माहूरच्या ईशान्येला मच्छिंद्रपार्डी नावाचे गाव आहे. राजा आणि कुंदन सिंगने मच्छिंद्रपार्डीत वसूली करण्याचा निर्णय घेतला. सगळे तिथे गेले. सावकार गोदाजी मुखरेंच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. हाती बंदुका घेऊन पैसे वसूल करण्याची ही पहिलीच वेळ होती. मुखरेंनी थैलीच भरून दिली. गावात सगळ्यांना दम दिला गेला. सगळ्यांनी आपापल्या जवळचे पैसे काढून दिले. शामाला हे पटेना. पण मैत्रीखातर म्हणून तो आला होता. सगळ्या गावातून आवतामागे दहा रुपये वसूल केले गेले. पहिल्याच दिवशी साठ हजार रुपये जमा झाले. आता त्यांची रोज एका एका गावातून वसूली सुरू झाली. दिवसेंदिवस या डाकुंचा त्रास वाढू लागला, तशा पोलीस ठाण्यात तक्रारी पडू लागल्या. त्याच वेगाने पोलिसांनी यांना पकडण्यासाठी कंबर कसली. 

               आता फरार होऊन वर्ष होत आलं होतं. टोळीचा मुक्काम किल्ल्यावर होता. दुपार होत आली असल्यामुळे जेवणाची व्यवस्था लावायला राजा गावात जाऊन एक बोकुड घेऊन आला. दगडांची चूल रचून त्यावर मटण आणि भात शिजायला टाकलं. इतक्यात गावातून एक खबरी बातमी घेऊन आला. ‘ पोलीसांना ऑर्डर आहेत. दिसल्याजागी टोळीतील कोणालाही गोळी घालून मारण्याचे. गावकऱ्यांनी तुमचा पत्ता सांगितला. पोलिस किल्ल्याकडेच येत आहेत.’ त्यांनी किल्ल्यावरून खाली बघितलं. गावाकडच्या बाजूला २००-३०० पोलीस येऊन थांबले होते. आता नाही तर थोड्यावेळाने पोलिसांसोबत सामना करायचाच होता. राजा म्हणे आपण इथूनच त्यांच्यावर गोळीबार करू. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी आपल्या बंदुकात काडतुसं भरले आणि पोलिसांवर जोराचा मारा केला. अचानक झालेल्या माऱ्याला पोलीसांना उत्तर देता आलं नाही. तरी त्यातल्या काही पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. अखेर पोलीस पांगले. थोड्याच वेळात गावकरी लोक पोलीसांना घेऊन महाकाली बुरुजाच्या रस्त्याने येताना दिसले. टोळीने किल्ला सोडला आणि आत जंगलात जाऊन थांबले. रात्र झाल्यावर पुन्हा किल्ल्यावर आले. पण या वेळी पोलीस जरा जास्तच खंबीर झाले होते. रात्रीचं जेवण सुरू असताना अचानक टोळीवर हल्ला झाला. पोलिस किल्ल्यावर येऊन पोहोचले होते. प्रत्युत्तर देता देता राजा आणि कुंदन सिंग गंभीर जखमी झाले. वाघ्या आणि इतर दोघं पळून गेले. शामाने एक जागा हेरली आणि तो लपून राहिला. तिथून तो पोलीसांवर गोळ्या झाडू लागला. थोड्यावेळाने राजा आणि कुंदनसिंह थांबले. पोलिसांचा गोळीबारही थांबला. पोलिसांनी गावकऱ्यांना समोर जाऊन बघायला सांगितलं. गावकरी शामाच्या जवळ येऊ लागले. शामा आपल्या जागेवरून उठला. त्याने राजाला हलवून बघितलं. राजा निपचित पडला होता. कुंदनसिंगला आवाज देऊन बघितला त्याचंही उत्तर आलं नाही. लोक जवळ येत होते. शामा ने एक गोळी गावकऱ्यांच्या डोक्यावरून झाडली. सगळे गावकरी पसार झाले. पोलिसही भितीने मागे हटले. शामाला आता तिथून निघून जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शामाने पोलिसांवर अजून गोळ्या झाडल्या आणि तिथून पसार झाला. 

               शामा मध्यरात्रीच्या वेळी अजनी गावी आला. वस्तीच्या नाईकाला भेटला. दुसऱ्या दिवशी वाघ्या आणि शिवर्या पोलीसांना शरण गेले. गावकऱ्यांनीच त्यांना शामाच्या सांगण्यावरून पोलिसांत नेऊन दिलं.

गावचे पाटील म्हणाले, “शामाजी, हे दोघं शरण चालले. तुमचे दोन साथीदार आधीच मारले गेलेत. आता तुम्ही एकटेच आणि तुमच्या मागे सगळी पोलिसांची फौज. तुम्ही पण शरण का नाही येत? मी म्हणतो, तुम्ही पण ठाण्यावर हजर व्हा..”

त्यावर शामा म्हणे, “ तू म्हणतं ते बराबर हाय, मले वाटते. पन ठाण्यावर खुद हजर होणं हा डाकूचा धरम नाही. मी आखरीलोक तसं करणार नाही. मरीन तं पोलीसाईच्या बंदुकीची गोयी खाऊनच मरीन. हे माही जिद हाय.”

               वर्षभरातच शामाचे सगळे साथीदार निघून गेले होते. पण त्याच्या भक्कम आयुष्याला नाजूक किनार देणारी, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी आणि वेळ प्रसंगी त्याच्या खांद्याला खांदा लावून झुंज देणारी ‘शारजी’ त्याच्या आयुष्यात आली. पुढे चौदा वर्षे शामाचे दुसरे नाव होते ‘टेरर’. ‘शामा कोलाम’ नाव ऐकताच अनेकांची पाचावर धारण बसे. दोघांनी अनेक सावकारांच्या घरांवर डाके टाकले. पण ते एका हाताने लुटत होते आणि शंभर हातांनी वाटत होते. गोळा बेरीज करून शेवटी शामाच्या हातात काहीच पैसे उरत नसत. बघता बघता शामा चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि आदिलाबाद या जिल्ह्यांतील गरिबांचा देवता झाला.









१. (राजे उदाराम घराण्याचे १८०३ साली ६ भावंडांमध्ये वाशिम, कळमनुरी, पुसद, वारा, माहूर आणि उमरखेड असे ६ विभाग पडले होते.)

२. शिकारी राजाच्या जीवनावर राजे मधुकरराव देशमुख यांनी पुस्तक लिहिले आहे - ‘शिकारी राजा’ , निर्मल प्रकाशन, नांदेड




संदर्भ : 

१. बिलामत , लेखक - श्री. दिनकर दाभाडे

२. शिकारनामा, लेखक - राजे मधुकरराव देशमुख, माहूर









पुढे वाचा : 

भाग २ - शामा कोलामचा रामराम पोहोचे

भाग ३ - रझाकारांचा कर्दनकाळ - शामा कोलाम 

© विनीत राजे

Comments

  1. खूप चांगली माहिती आहे आणी ही माहिती कोलाम समाजाच्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचला पाहिजे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोण होती रायबागन?

      “माहूरचा रामगड किल्ला”        ई. स. १६५८ मध्ये औरंगझेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मुघल साम्राज्यात दोन गट पडले, एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगझेबाचा. औरंगझेबाच्या बाजूने माहूरच्या राजे  उदाराम यांचा मुलगा जगजीवनराव लढत होता. आग्र्याजवळ समुगढ येथे  दारा आणि औरंगझेब यांच्यात निर्णायक लढाई झाली. या लढाईत जगजीवनराव मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याचे नेतृत्व एका स्त्रीने केले. सैन्यात लढणाऱ्या एकमेव स्त्रीला औरंगझेबाने बघितले असावे. तिच्या असामान्य शौर्याने तो प्रभावित झाला.  त्या लढाईत औरंगझेबाचा विजय झाला. त्या लढणाऱ्या स्त्रीचा लौकिक सर्वत्र पसरला होता. औरंगझेबाने रीतसर गादीवर स्वतःला बसवून घेतल्यानंतर त्या स्त्रीस बोलाविण्याची आज्ञा केली. त्या प्रमाणे ती स्त्री दरबारात हजर झाली. ज्ञात झाले की ती माहूरचे मुघल सरदार राजे उदाजी राम यांची पत्नी आहे. तिचे नाव सावित्रीबाई. डोळ्यासमोर पोटच्या मुलाचा मृत्यू झालेला बघून देखील खचून न जाता ती प्राणपणाने लढली होती. औरंगझेबाने तिला “रायबागन” हा खिताब बहाल केला. रायबाग

मुघलांपूर्वीचे वऱ्हाड

        १५ व्या शतकात दक्षिण भारतातली बहामनी सल्तनत कोसळल्यावर त्यातून ५ छोटी छोटी राज्ये उभी राहिली. अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३७), गोवळकोंड्याची कुतुबशाही(१५१८-१६८६), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६८६), बिदरची बरिदशाही(१५२६-१६१९) आणि वऱ्हाडची इमादशाही(१४८४-१५७४).  ई. स. १५७४ मध्ये मूर्तजा निजामशाह ने वऱ्हाड प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडून घेतला. आणि इमादशाही संपुष्टात आली. पण निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे फार काळ निजामशाहीचा वऱ्हाडात अंमल राहू शकला नाही. मुर्तजा निजामशाह पहिला याच्या मृत्यूनंतर इब्राहिम निजामशाह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर निजामशाहीतल्या ४ अमीरांनी ४ दिशांना तोंडे फिरवली. प्रत्येकाने एकेक गादीचा दावेदार निवडला आणि ते आपसांत लढू लागले. त्यातला मियां मंझु नावाचा सरदार इखलास खानाविरुद्ध लढत असता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला, तेव्हा त्याने गुजरातेत स्थित मुघल बादशाह अकबराचा पुत्र शाहजादा मुराद, याची मदत मागितली. मुराद दख्खनच्या राजकारणावर नजर ठेऊन होता आणि योग्य संधी मिळण्याची वाट बघत होता. आता त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने अकबराचा कौल घेतला आणि  आपल्य

सिंदखेडचे जाधवराव

राजे लखुजी जाधवराव          सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवराव यांच्या आश्रयाला गेली. जाध

माहूरचे राजे उदाराम

“माहूर येथील हत्तीखाना”                 मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या राजे उद्धवजी रामजी उर्फ राजे उदाराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उद्धवजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्षण घेतले असावे.  काही काळातच त्यांनी एक

दख्खनचे राजकारण : ई. स. १६१६ ते १६२१

          ई. स. १६१६ च्या रोशनगावच्या लढाईत† सपाटून मार खाल्ल्यानंतर मलिक अंबरने आपले गमावलेले मराठा सरदार परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला. त्यात वर्षभरात त्याला यश मिळालं. लखुजीराजे, उदाराम पंडित आणि बाबाजी कायथ यांनी मुघल छावणी सोडून निजामशाहीत पुनः प्रवेश केला. पण काही काळातच मलिक अंबर आणि मराठ्यांच्या ह्या गटातील मतभेद पुन्हा वर येऊ लागले. मलिक अंबरने बाबाजी कायथची कपटाने हत्या करवली. आणि राजे उदाराम यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले. उदारामांनी त्या सैन्याचा पराभव केला. आणि निजामशाही मुलुखात धोका असल्याचे जाणून आदिलशहाशी पत्रव्यवहार सुरू केला. पण मलिक अंबर आणि आदिलशहाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आदिलशाही दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. अखेर मुघल सुभेदार खान खानान याच्याशी बोलणी करून उदाराम मुघल छावणीत दाखल झाले.           इकडे रोशनगावची लढाई संपते न संपते तोच जहाँगीर बादशहाने आपला मुलगा खूर्रम याला दक्षिणेत पाठवले. १६ ऑक्टोबर १६१६ रोजी शहजादा खुर्रम अजमेर हून निघाला आणि  ई. स. १६१७ च्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरात येऊन दाखल झाला. बुऱ्हाणपूरला पोहोचताच त्याने मलिक अंबर विरुद्ध

Shama Kolam : The Accidental Bandit

  Life of Shama Kolam : Part One                 Shama Kolam , famously known as Robinhood of Vidarbha , was born on 26 th November, 1899 in village of Niranjan Mahur in Nanded district in an aboriginal ‘Kolam tribe’. It is said that Kolams are Dravidian. Their language – Kolami- has resemblance with Dravidian languages. 1 Kolams are mostly populated in Yavatmal district of Maharashtra state. They are spread to the other adjacent districts of Nanded, Adilabad & Chandrapur. It is one of the most backward aboriginal communities of India. Though they have some cultural semblance with Gonds, they are different from Gonds in many aspects. There’s no caste hierarchy in Kolams. They are mostly divided by surnames which have been adopted from the names of villlages. 2                Shama was born in one of the poor families and brought up in the adjacent jungles of Mahur and Nanded. Short but stout and strongly built, Shama was polite in his conduct. He was illiterate and worked as a

मराठ्यांचे महत्त्व १ : मलिक अंबर !

 देवगिरी किल्ल्याचे भग्नावशेष          मलिक अंबराच्या कारकिर्दीतील निजामशाहीचा इतिहास म्हणजे मुघल आणि दख्खनी शाह्या यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. मलिक अंबराने निझाम, आदिल, कुतुब या तिन्ही शह्यांना एकत्र आणून मुघलांना जवळजवळ वीस वर्ष दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरलं. गनिमी कावा युद्धतंत्राने त्याने मुघली फौजांना हैराण करून सोडलं. आणि त्यात त्याला सगळ्यात जास्त मदत झाली ती मराठ्यांच्या चपळ सैन्याची. ह्या कारणामुळे अंबराच्या कार्यकाळात मराठ्यांचा उदय झाला. पण याचा अर्थ मलिक अंबराचे मराठ्यांवर काही विशेष उपकार आहेत असा होत नाही.            ई. स. १६०७ मध्ये मलिक अंबराने राजू दख्खनीला कैद करून त्याच्या अखत्यारीतला मुलुख निजामशाही राज्याला जोडला आणि संपूर्ण निजामशाही सत्ता आपल्या वर्चस्वाखाली आणली. पुढे मुर्तझा निझामशाह दुसरा याच्याशी असलेले मतभेद संपवून त्याने आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. तोपर्यंत मुघलांनी अहमदनगर आणि बराच निजामशाहीचा मुलुख काबीज केला होता. ई. स. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला, पण सुरूवातीची काही वर्षे तो शाहजादा खुसरौच्या बंडामुळे आणि पर्शिय

राजे जगदेवराव जाधव यांची दिनचर्या

राजे जगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ              वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. श्रीशिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ. स. १५७५ च्या सुमारास संपादन केली. मोगल दरबारातून त्यांना १२००० फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते. याशिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते. त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले. प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी, त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरीलप्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजेसह नेमले होते. कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता, विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला. मोठे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात त्यांना यश आले तरी स्वत

“शामा कोलामचा रामराम पोहोचे”

भाग - २                  १ ९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला.                घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शामा स्वतः उनी- उमरी नावाच्या गावी जाऊन भिवरेचं लग्न ठरवून आला. काही दिवसात तिचं लग्न झालं.