Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

सिंदखेडचे जाधवराव

राजे लखुजी जाधवराव          सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवर...

मुघलांपूर्वीचे वऱ्हाड

        १५ व्या शतकात दक्षिण भारतातली बहामनी सल्तनत कोसळल्यावर त्यातून ५ छोटी छोटी राज्ये उभी राहिली. अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३७), गोवळकोंड्याची कुतुबशाही(१५१८-१६८६), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६८६), बिदरची बरिदशाही(१५२६-१६१९) आणि वऱ्हाडची इमादशाही(१४८४-१५७४).  ई. स. १५७४ मध्ये मूर्तजा निजामशाह ने वऱ्हाड प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडून घेतला. आणि इमादशाही संपुष्टात आली. पण निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे फार काळ निजामशाहीचा वऱ्हाडात अंमल राहू शकला नाही. मुर्तजा निजामशाह पहिला याच्या मृत्यूनंतर इब्राहिम निजामशाह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर निजामशाहीतल्या ४ अमीरांनी ४ दिशांना तोंडे फिरवली. प्रत्येकाने एकेक गादीचा दावेदार निवडला आणि ते आपसांत लढू लागले. त्यातला मियां मंझु नावाचा सरदार इखलास खानाविरुद्ध लढत असता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला, तेव्हा त्याने गुजरातेत स्थित मुघल बादशाह अकबराचा पुत्र शाहजादा मुराद, याची मदत मागितली. मुराद दख्खनच्या राजकारणावर नजर ठेऊन होता आणि योग्य संधी मिळण्याची वाट बघत होता. आता त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने अकबर...

कोण होती रायबागन?

                      ई. स. १६५८ मध्ये औरंगजेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मोगल साम्राज्यात दोन गट पडले - एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगजेबाचा. अशी बंडाळी माजली असताना माहुरच्या राजे उदाजीराम (मृ.१६३२) यांचा मुलगा  जगजीवनराव याने शहजहान बादशहास एक पत्र लिहिले. त्यात तो म्हणतो,  "  माझ्या शत्रूंचा माझ्या परिवारास संपवून टाकण्याचा कट आहे  ". यावर  शहजहानने ४ शाबान १०६८ हिजरी (ई. स. १६५७) रोजी जगजीवनरावाला उत्तर पाठवले,  " तुझ्या परिवाराच्या संरक्षणासाठी बादशहाने सैन्य पाठविले आहे. तू आपल्या सैन्यासह बादशहाच्या दरबारात  हजर व्हावे. "                 शहजहानचे सैन्य माहुरला पोहोचले की नाही हे कळत नाही. पुढच्या पत्रातील मजकुरातून शहजहानच्या भेटीला जगजीवनराव गेल्याचेही दिसत नाही. २९ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि दाराशुकोह यांच्यात सामुगढ येथे तुंबळ लढाई झाली. जगजीवनरावाने औरंगजेबाला सहाय्य केले. या लढाईत जगजीव...