Skip to main content

Posts

मराठ्यांचे महत्त्व २ : रोशनगांवची लढाई !

माहूर येथील किल्ल्याचा हत्ती दरवाजा            ई. स.१६१२ मध्ये अंबराने आपली राजधानी देवगिरीहून खडकीला हलवली. मलिक अंबराच्या सैन्याकडून अनेकदा पराभूत झाल्यानंतर मोगलांना अंबराची खरी ताकद कळू लागली होती. याच दरम्यान मलिक अंबर आणि मराठा सरदारांच्या एका गटामध्ये मतभेद उत्पन्न होऊ लागले होते. लखुजी जाधवराव आणि उदाजीराम हे त्यात मुख्य होते. त्यांच्यात नेमके काय मतभेद होते, हे ज्ञात नाही. पण याचा बराच फायदा मोगलांना झाला, हे मात्र निश्चित. पराजयाची मालिका कशी थांबवावी या पेचात असताना जहांगीर बादशहाने पुन्हा खान इ खानानला दख्खनचा सुभेदार नेमलं. खान इ खानान मोगलांमध्ये दख्खनचा जाणता होता. त्याच्या तीन मुलांना मनसबदारी आणि बक्षिसे देऊन त्याला मलिक अंबराचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवण्यात आलं. बाळापूर येथे मोगली सैन्याचा तळ पडला. आधीचे पराभव तो विसरला नव्हता. आता त्याने शांततापूर्ण पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. पूर्वीप्रमाणेच मोगली सरदारांमध्ये आपसांत मतभेद, द्वेष ई. कायम होते. त्याने हळूहळू ही डोकेदुखी कमी केली. एक एक करून सरदार मरू लागले. आपल्या विरोधकांना संपवल...

मराठ्यांचे महत्त्व १ : मलिक अंबर !

 देवगिरी किल्ल्याचे भग्नावशेष          मलिक अंबराच्या कारकिर्दीतील निजामशाहीचा इतिहास म्हणजे मुघल आणि दख्खनी शाह्या यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. मलिक अंबराने निझाम, आदिल, कुतुब या तिन्ही शह्यांना एकत्र आणून मुघलांना जवळजवळ वीस वर्ष दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरलं. गनिमी कावा युद्धतंत्राने त्याने मुघली फौजांना हैराण करून सोडलं. आणि त्यात त्याला सगळ्यात जास्त मदत झाली ती मराठ्यांच्या चपळ सैन्याची. ह्या कारणामुळे अंबराच्या कार्यकाळात मराठ्यांचा उदय झाला. पण याचा अर्थ मलिक अंबराचे मराठ्यांवर काही विशेष उपकार आहेत असा होत नाही.            ई. स. १६०७ मध्ये मलिक अंबराने राजू दख्खनीला कैद करून त्याच्या अखत्यारीतला मुलुख निजामशाही राज्याला जोडला आणि संपूर्ण निजामशाही सत्ता आपल्या वर्चस्वाखाली आणली. पुढे मुर्तझा निझामशाह दुसरा याच्याशी असलेले मतभेद संपवून त्याने आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. तोपर्यंत मुघलांनी अहमदनगर आणि बराच निजामशाहीचा मुलुख काबीज केला होता. ई. स. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला, पण सुर...

माहूरचे राजे उदाराम

“माहूर येथील हत्तीखाना”                 मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या राजे उद्धवजी रामजी उर्फ राजे उदाराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उद्धवजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्...

सिंदखेडचे जाधवराव

राजे लखुजी जाधवराव          सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवर...

मुघलांपूर्वीचे वऱ्हाड

        १५ व्या शतकात दक्षिण भारतातली बहामनी सल्तनत कोसळल्यावर त्यातून ५ छोटी छोटी राज्ये उभी राहिली. अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३७), गोवळकोंड्याची कुतुबशाही(१५१८-१६८६), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६८६), बिदरची बरिदशाही(१५२६-१६१९) आणि वऱ्हाडची इमादशाही(१४८४-१५७४).  ई. स. १५७४ मध्ये मूर्तजा निजामशाह ने वऱ्हाड प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडून घेतला. आणि इमादशाही संपुष्टात आली. पण निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे फार काळ निजामशाहीचा वऱ्हाडात अंमल राहू शकला नाही. मुर्तजा निजामशाह पहिला याच्या मृत्यूनंतर इब्राहिम निजामशाह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर निजामशाहीतल्या ४ अमीरांनी ४ दिशांना तोंडे फिरवली. प्रत्येकाने एकेक गादीचा दावेदार निवडला आणि ते आपसांत लढू लागले. त्यातला मियां मंझु नावाचा सरदार इखलास खानाविरुद्ध लढत असता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला, तेव्हा त्याने गुजरातेत स्थित मुघल बादशाह अकबराचा पुत्र शाहजादा मुराद, याची मदत मागितली. मुराद दख्खनच्या राजकारणावर नजर ठेऊन होता आणि योग्य संधी मिळण्याची वाट बघत होता. आता त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने अकबर...

कोण होती रायबागन?

                      ई. स. १६५८ मध्ये औरंगजेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मोगल साम्राज्यात दोन गट पडले - एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगजेबाचा. अशी बंडाळी माजली असताना माहुरच्या राजे उदाजीराम (मृ.१६३२) यांचा मुलगा  जगजीवनराव याने शहजहान बादशहास एक पत्र लिहिले. त्यात तो म्हणतो,  "  माझ्या शत्रूंचा माझ्या परिवारास संपवून टाकण्याचा कट आहे  ". यावर  शहजहानने ४ शाबान १०६८ हिजरी (ई. स. १६५७) रोजी जगजीवनरावाला उत्तर पाठवले,  " तुझ्या परिवाराच्या संरक्षणासाठी बादशहाने सैन्य पाठविले आहे. तू आपल्या सैन्यासह बादशहाच्या दरबारात  हजर व्हावे. "                 शहजहानचे सैन्य माहुरला पोहोचले की नाही हे कळत नाही. पुढच्या पत्रातील मजकुरातून शहजहानच्या भेटीला जगजीवनराव गेल्याचेही दिसत नाही. २९ मे १६५८ रोजी औरंगजेब आणि दाराशुकोह यांच्यात सामुगढ येथे तुंबळ लढाई झाली. जगजीवनरावाने औरंगजेबाला सहाय्य केले. या लढाईत जगजीव...