Skip to main content

मराठ्यांचे महत्त्व १ : मलिक अंबर !

 देवगिरी किल्ल्याचे भग्नावशेष


         मलिक अंबराच्या कारकिर्दीतील निजामशाहीचा इतिहास म्हणजे मुघल आणि दख्खनी शाह्या यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे. मलिक अंबराने निझाम, आदिल, कुतुब या तिन्ही शह्यांना एकत्र आणून मुघलांना जवळजवळ वीस वर्ष दख्खन काबीज करण्यापासून रोखून धरलं. गनिमी कावा युद्धतंत्राने त्याने मुघली फौजांना हैराण करून सोडलं. आणि त्यात त्याला सगळ्यात जास्त मदत झाली ती मराठ्यांच्या चपळ सैन्याची. ह्या कारणामुळे अंबराच्या कार्यकाळात मराठ्यांचा उदय झाला. पण याचा अर्थ मलिक अंबराचे मराठ्यांवर काही विशेष उपकार आहेत असा होत नाही.
           ई. स. १६०७ मध्ये मलिक अंबराने राजू दख्खनीला कैद करून त्याच्या अखत्यारीतला मुलुख निजामशाही राज्याला जोडला आणि संपूर्ण निजामशाही सत्ता आपल्या वर्चस्वाखाली आणली. पुढे मुर्तझा निझामशाह दुसरा याच्याशी असलेले मतभेद संपवून त्याने आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. तोपर्यंत मुघलांनी अहमदनगर आणि बराच निजामशाहीचा मुलुख काबीज केला होता. ई. स. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला, पण सुरूवातीची काही वर्षे तो शाहजादा खुसरौच्या बंडामुळे आणि पर्शियन शाहच्या आक्रमणामुळे दख्खनकडे लक्ष देऊ शकला नाही. याकाळात अब्दूर रहीम खान इ खानान हा दख्खनचा सुभेदार होता. मलिक अंबरच्या सैन्याशी झालेल्या बऱ्याच चकमकिंमध्ये त्याने सपाटून मार खाल्ला होता. ई.स.१६०५ ते ई.स.१६०८ या काळात मलिक अंबराने मुघलांच्या ताब्यातला बराच निजामशाही मुलुख परत जिंकून घेतला. जहांगीराला सवड मिळताच त्याने खान इ खानानला आग्र्याला बोलावून घेतले आणि त्याच्या मागणीनुसार त्याला १२००० घोडदळ आणि रुपये दहा लाख रोख देऊन त्याची परत दख्खनला पाठवणी केली. मुघलांच्या येणाऱ्या अफाट फौजेला तोंड द्यायला मलिक अंबराला आदिलशाह आणि कुतुबशाह यांची मदत लागणार होती. त्याप्रमाणे त्याने ती मिळवली. आदिलशाहने अंबराच्या मदतीला १०,००० घोडदळ पाठवले.
           इकडे खान इ खानान मोठ्या फौजेनिशी येऊन तर पोहोचला पण त्याच्या सोबत पाठवलेल्या मनसबदारांवर त्याची पकड नव्हती. त्याने अंबरावर अचानक हल्ला करण्याचा बेत आखला. सुरुवातीला त्याला काही आघाड्यांवर यश मिळालं. पण काही काळातच अंबराने पुन्हा जोर धरला. त्याच्या सैन्यातील ‘चपळ मराठा घोडेस्वारांनी’ मुघल फौजेला सळो की पळो करून सोडलं. खान इ खानान च्या सैन्याला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. त्याने बादशाह कडे अजुन सैन्याची मागणी केली. ई. स. १६०९ मध्ये जहांगीरने शाहजादा परवेझला अजुन कुमक देऊन राजा मानसिंह आणि असफ खान यांच्या सोबत दख्खनला पाठवलं. या सैन्याने अहमदनगर कडे कूच केली. पण मराठा घोडेस्वारांच्या ताफ्यांनी गनिमी काव्याने लढून त्यांना हैराण करून सोडलं. अखेर मुघल सैन्याला माघारी परतावं लागलं. परवेझ ते सैन्य घेऊन बुऱ्हाणपूराकडे निघून गेला. मराठ्यांचं सैन्यच मुळात गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध होतं.
          पराभवावर पराभव पत्करावा लागल्यामुळे मुघली सैन्यातला उत्साह विरून गेला होता. असफ खानाने बादशहाला स्वतः येऊन सैन्यात ऊर्जा आणण्याची विनंती केली. त्यावर जहांगीर विचार करू लागला. पण खानजहान लोदीने स्वतः जबाबदारी घेतली. खानजहान लोदी ही जहांगीर बादशहाची दरबारातील सगळ्यात जिवलग व्यक्ती. लोदी दख्खन कडे निघाला. सैन्यात दुफळी माजल्यामुळे खान इ खानानला जहांगिरने बोलावून घेतले आणि त्याच्याजागी ई. स. १६११ साली लोदीची नेमणूक केली. लोदीने महत्त्वपूर्ण यश संपादन करण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याच्या हातात काहीच लागलं नाही. मोगली सैन्यामध्ये स्थानिक लोकांचा अभाव होता. दक्षिणेतील मुलुख जिंकायचा तर तिथली इत्यंभूत माहिती असलेले लोक सैन्यात पाहिजेत. तिथल्या घाटांची ओळख असलेले, तिथल्या पहाडांशी, वळणांशी, नद्यांशी मैत्री असलेले लोक हवेत. त्याची मुघल सैन्यात कमतरता होती. याउलट अंबराच्या सैन्यात मराठ्यांचा प्रभाव वाढत होता. भोसले, जाधवराव, कायथ, उदाजीराम, यांसारख्या सेनानींचा भरणा हा निजामशाहीचा एक अत्यंत महत्त्वाचा अंग बनला होता. याच दरम्यान मलिक अंबराने आपली राजधानी जुन्नरहून देवगिरीला (दौलताबाद) हलवली.
           आता जहांगीरने नवीन बेत आखला. अब्दुल्ला खान नावाचा गुजरातचा सुभेदार होता. त्याच्याबरोबर राजा रामदास आणि इतर सरदार देऊन त्याला नाशिक त्र्यंबकेश्वर कडून तर खानजहान लोदीला दक्षिण वऱ्हाड कडून, असा दोन आघाड्यांवर एकाच वेळी हल्ला करायचा आदेश दिला. दक्षिण वऱ्हाड म्हणजे माहूर बालाघाट. हा मुलुख तेव्हा निजामशाहीत होता. दोन्ही सैन्यांनी बादशहाच्या आज्ञेनुसार एकमेकांना आपल्या हालचालींबद्दल माहिती पुरवायची होती. अब्दुल्ला खानाने मेवाडमध्ये तलवार गाजवल्यामुळे त्याला ही कामगिरी देण्यात आली होती. पण उत्साहाच्या आणि गर्वाच्या भरात त्याने वऱ्हाडकडून येणाऱ्या आघाडीला न कळवता घाईघाईने कूच केली आणि घाट ओलांडून पलीकडे निजामशाही मुलुखात तो जाऊ लागला. मलिक अंबराने आदिल, कुतुब आणि बरिद यांच्याकडून सैन्य मागवले होते. नेहमीप्रमाणे ‘चपळ मराठा घोडेस्वारांचे’ ताफे मोगली सैन्यावर पाठवले. अब्दुल्ला खानाच्या सैन्याची संख्या जास्त असल्याने मलिक अंबराला मराठा सैन्याच्या साहाय्याने गनिमी कावा तंत्राने लढणे भाग होते . या ताफ्यांनी मुघली सैन्याला वेगवेगळ्या दिशांनी हल्ले करून, रोजच्या छोट्या छोट्या चकमकी घडवून, अचानक धाडी टाकून, लूट करीत हैराण करून सोडलं. रसद तोडून पुरवठा बंद पाडणे, झाडांमध्ये लपून बाणांचा वर्षाव करणे, रात्री आगीचे बाण सोडणे, अशा हल्ल्यांमुळे अब्दुल्ला खानाची फौज जेरीस आली. अंबराच्या सैन्याचे अब्दुल्ला सोबत एकही समोरासमोर युद्ध झाले नाही. पण खडकीला येईपर्यंत त्याच्या सैन्याची भरपूर हानी झाली होती. खडकिला आल्यावर अंबराच्या इतर सैन्याने त्याच्या सैन्यावर जोराचे हल्ले चढवले. मुघल सैन्य हल्ला रोखू शकले नाही. अब्दुल्ला बागलाणकडे पळून जाऊ लागला. पण त्याला जाताना वाटेत अंबराच्या मराठा सैन्याने लुटले. त्यांनी बागलाण पर्यंत त्याचा पाठलाग केला. वऱ्हाड मार्गाने येणाऱ्या सैन्याला अब्दुल्लाच्या झालेल्या अवस्थेची खबर मिळाली तेव्हा तेही परत माघारी फिरले. या सगळ्या विजयात मराठा सैनिकांचा सिंहाचा वाटा होता. ई. स.१६१२ मध्ये खडकी येथे झालेल्या या युद्धात मलिक अंबराच्या सैन्याची फत्ते झाली, म्हणून अंबराने खडकीचे नाव बदलून ‘फतहनगर’ ठेवले. पण ह्याच खडकीत त्याला त्याच्याच काही चूकांमुळे दारुण पराभव पत्करावा लागेल हे त्याला तरी काय माहीत होतं !
(पुढे वाचा “मराठ्यांचे महत्त्व २ : रोशनगांवची लढाई !”)







संदर्भ सूची :


१. ‘Malik Ambar’ By Jogindranath Chowdhury
२. Thesis submitted by Mohd. Siraj Anwar : Relations of The Mughal empire with The Ahmadnagar kingdom.
३. कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत
४. ‘Berar under the Mughals’ by Mohd. Yaseen Quddusi
     



©Copyrights reserved.

Comments

Popular posts from this blog

कोण होती रायबागन?

      “माहूरचा रामगड किल्ला”        ई. स. १६५८ मध्ये औरंगझेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले. त्याच्या दिमतीला बरेच राजपूत सरदार होते. मुघल साम्राज्यात दोन गट पडले, एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगझेबाचा. औरंगझेबाच्या बाजूने माहूरच्या राजे  उदाराम यांचा मुलगा जगजीवनराव लढत होता. आग्र्याजवळ समुगढ येथे  दारा आणि औरंगझेब यांच्यात निर्णायक लढाई झाली. या लढाईत जगजीवनराव मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सैन्याचे नेतृत्व एका स्त्रीने केले. सैन्यात लढणाऱ्या एकमेव स्त्रीला औरंगझेबाने बघितले असावे. तिच्या असामान्य शौर्याने तो प्रभावित झाला.  त्या लढाईत औरंगझेबाचा विजय झाला. त्या लढणाऱ्या स्त्रीचा लौकिक सर्वत्र पसरला होता. औरंगझेबाने रीतसर गादीवर स्वतःला बसवून घेतल्यानंतर त्या स्त्रीस बोलाविण्याची आज्ञा केली. त्या प्रमाणे ती स्त्री दरबारात हजर झाली. ज्ञात झाले की ती माहूरचे मुघल सरदार राजे उदाजी राम यांची पत्नी आहे. तिचे नाव सावित्रीबाई. डोळ्यासमोर पोटच्या मुलाचा मृत्यू झालेला बघून देखील खचून न जाता ती प्राणपणाने लढली होती. औरंगझेबाने तिला “रायबागन” हा खिताब बहाल केला. रायबाग

विदर्भाचे रॉबिनहुड - शामा दादा कोलाम भाग - १

                १९३५-३६ साल होतं. घनदाट जंगल असल्यामुळे अनेक हौशी शिकारी माहूर परिसरात तयार झाले होते. अनेक लोक बाहेरून येत. शिकारीसाठी काही दिवस माहूर किंवा आजूबाजूच्या गावी येऊन राहत. राजे उदाराम घराण्याच्या माहूर शाखेकडे अजूनही माहूरची जहागीरदारी होती.¹ माहूरचा कारभार त्या काळी राजे व्यंकटराव देशमुख उर्फ भाऊसाहेब बघत. त्यांच्याकडे एक शिकारी कामाला होता. त्याचे नाव राजा - शिकारी राजा². राजाचाच जिगरी दोस्त होता ‘ शामा कोलाम’.                शामाचा जन्म २६ नोव्हेंबर, १८९९ साली आदिवासी कोलाम समाजात माहूर गावीच झाला. वयाच्या तिसाव्या वर्षी भिवरा नावाच्या मुलीसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. दोघांना मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं दशरथ. शामा गावच्या पाटलाकडे गडी म्हणून कामाला होता. कधी कधी भाऊसाहेबांनी सांगितलेली कामे देखील तो करत असे. भाऊसाहेब स्वतः शिकारीला जात त्यावेळी राजा आणि शामा त्यांच्याबरोबरच असत. शामा उत्कृष्ठ नेमबाज होता.                भाऊसाहेबांनी घरी दोन वाघ पाळले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त राजा करत असे. एक दिवस राजा वाघांच्या पिंजऱ्यात झाडझुड करायला गेल्यावर अचानक वाघ

मुघलांपूर्वीचे वऱ्हाड

        १५ व्या शतकात दक्षिण भारतातली बहामनी सल्तनत कोसळल्यावर त्यातून ५ छोटी छोटी राज्ये उभी राहिली. अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३७), गोवळकोंड्याची कुतुबशाही(१५१८-१६८६), विजापूरची आदिलशाही(१४८९-१६८६), बिदरची बरिदशाही(१५२६-१६१९) आणि वऱ्हाडची इमादशाही(१४८४-१५७४).  ई. स. १५७४ मध्ये मूर्तजा निजामशाह ने वऱ्हाड प्रांत जिंकून आपल्या राज्याला जोडून घेतला. आणि इमादशाही संपुष्टात आली. पण निजामशाहीतील अंतर्गत कलहामुळे फार काळ निजामशाहीचा वऱ्हाडात अंमल राहू शकला नाही. मुर्तजा निजामशाह पहिला याच्या मृत्यूनंतर इब्राहिम निजामशाह गादीवर आला. त्याच्या मृत्यूनंतर निजामशाहीतल्या ४ अमीरांनी ४ दिशांना तोंडे फिरवली. प्रत्येकाने एकेक गादीचा दावेदार निवडला आणि ते आपसांत लढू लागले. त्यातला मियां मंझु नावाचा सरदार इखलास खानाविरुद्ध लढत असता पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला, तेव्हा त्याने गुजरातेत स्थित मुघल बादशाह अकबराचा पुत्र शाहजादा मुराद, याची मदत मागितली. मुराद दख्खनच्या राजकारणावर नजर ठेऊन होता आणि योग्य संधी मिळण्याची वाट बघत होता. आता त्याला आयती संधी चालून आली होती. त्याने अकबराचा कौल घेतला आणि  आपल्य

सिंदखेडचे जाधवराव

राजे लखुजी जाधवराव          सिंदखेडकर जाधवरावांच्या बखरीनुसार १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात सिंदखेडची जहागीरदारी एका काझी नावाच्या घराण्याकडे होती. ती जहागीर त्यांच्याकडे बहामनी काळापासून चालत आलेली होती. ई. स. १५७० च्या आसपास रवीराव धोंडे हा काझीचा दिवाण होता. धार्मिक वृत्तीचा काझी अध्यात्माकडे झुकल्याने त्याला जहागिरी च्या कारभारात विशेष रस नव्हता. रवीरावने याचा पुरेपूर फायदा घेतला.  त्याने काझीकडून काही प्रशासकीय हक्क मिळवले. आणि हळू हळू आपले हातपाय पसरायला सुरूवात केली. काही काळातच त्याने काझीच्या विश्वासातल्या सगळ्यांचे खून करून पूर्ण मुलुख आपल्या ताब्यात घेतला. अर्थातच तोपर्यंत काझी स्वतः कमकुवत झाला होता. रवीरावचा धोका लक्षात येताच ‘ मुळे ’ नावाच्या काझीच्या वकीलाने रवीरावच्या विरोधात खटपटी सुरू केल्या. रवीरावने त्या वकीलाचा खून कराविला. त्यानंतर रविरावची नजर वकीलाच्या गरोदर पत्नीवर गेली. आपल्या पतीच्या खूनाने क्षुब्ध झालेल्या त्या स्त्रीने रवीरावापासून असलेला धोका ओळखला आणि त्याच्या हातात लागण्याआधीच ती आपल्या परिवाराला घेऊन पैठणचे देशमुख जाधवराव यांच्या आश्रयाला गेली. जाध

माहूरचे राजे उदाराम

“माहूर येथील हत्तीखाना”                 मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या राजे उद्धवजी रामजी उर्फ राजे उदाराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उद्धवजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्षण घेतले असावे.  काही काळातच त्यांनी एक

दख्खनचे राजकारण : ई. स. १६१६ ते १६२१

          ई. स. १६१६ च्या रोशनगावच्या लढाईत† सपाटून मार खाल्ल्यानंतर मलिक अंबरने आपले गमावलेले मराठा सरदार परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला. त्यात वर्षभरात त्याला यश मिळालं. लखुजीराजे, उदाराम पंडित आणि बाबाजी कायथ यांनी मुघल छावणी सोडून निजामशाहीत पुनः प्रवेश केला. पण काही काळातच मलिक अंबर आणि मराठ्यांच्या ह्या गटातील मतभेद पुन्हा वर येऊ लागले. मलिक अंबरने बाबाजी कायथची कपटाने हत्या करवली. आणि राजे उदाराम यांना मारण्यासाठी सैन्य पाठवले. उदारामांनी त्या सैन्याचा पराभव केला. आणि निजामशाही मुलुखात धोका असल्याचे जाणून आदिलशहाशी पत्रव्यवहार सुरू केला. पण मलिक अंबर आणि आदिलशहाचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने आदिलशाही दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले होते. अखेर मुघल सुभेदार खान खानान याच्याशी बोलणी करून उदाराम मुघल छावणीत दाखल झाले.           इकडे रोशनगावची लढाई संपते न संपते तोच जहाँगीर बादशहाने आपला मुलगा खूर्रम याला दक्षिणेत पाठवले. १६ ऑक्टोबर १६१६ रोजी शहजादा खुर्रम अजमेर हून निघाला आणि  ई. स. १६१७ च्या सुरुवातीला बुऱ्हाणपूरात येऊन दाखल झाला. बुऱ्हाणपूरला पोहोचताच त्याने मलिक अंबर विरुद्ध

Shama Kolam : The Accidental Bandit

  Life of Shama Kolam : Part One                 Shama Kolam , famously known as Robinhood of Vidarbha , was born on 26 th November, 1899 in village of Niranjan Mahur in Nanded district in an aboriginal ‘Kolam tribe’. It is said that Kolams are Dravidian. Their language – Kolami- has resemblance with Dravidian languages. 1 Kolams are mostly populated in Yavatmal district of Maharashtra state. They are spread to the other adjacent districts of Nanded, Adilabad & Chandrapur. It is one of the most backward aboriginal communities of India. Though they have some cultural semblance with Gonds, they are different from Gonds in many aspects. There’s no caste hierarchy in Kolams. They are mostly divided by surnames which have been adopted from the names of villlages. 2                Shama was born in one of the poor families and brought up in the adjacent jungles of Mahur and Nanded. Short but stout and strongly built, Shama was polite in his conduct. He was illiterate and worked as a

राजे जगदेवराव जाधव यांची दिनचर्या

राजे जगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ              वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे. श्रीशिवाजी महाराजांची माता जिजाबाई यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ. स. १५७५ च्या सुमारास संपादन केली. मोगल दरबारातून त्यांना १२००० फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते. याशिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते. त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले. प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी, त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरीलप्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजेसह नेमले होते. कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता, विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला. मोठे घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात त्यांना यश आले तरी स्वत

“शामा कोलामचा रामराम पोहोचे”

भाग - २                  १ ९३६-३७ साल होतं. राजा आणि कुंदनसिंह पोलिसांच्या फायरींग मध्ये मारले गेल्यानंतर शामा एकटाच उरला होता. वर्धा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील जंगलांमधून तो दिवस काढू लागला. पोलिसांनी गावागावांतून दवंडी दिली - ‘कोणीही शामा कोलामला मदत करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. याआधी गावातून कोणी ना कोणी लाकूडफाटा तोडून आणायच्या बहाण्याने जंगलात जेवण, दारू आणून देत असे. आता ते ही बंद झाले. कधी रात्री एखाद्या कोलाम पाड्यात जाऊन असतील नसतील त्या भाकऱ्या घेऊन यावे आणि खावे असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. कधी जेवण मिळे कधी न मिळे. कधी दहाबारा दिवसांचे शिळे अन्न खावे लागे. अशा हलाखीच्या परिस्थितीत शामा आपले दिवस काढू लागला.                घर सोडून निघताना त्याने आपल्या भावंडांना आपल्या बायकोचं - भिवराचं - दुसरं लग्न लावुन द्यायला सांगितलं होतं. पण त्याच्या भितीमुळे कोणीच तिच्याशी लग्न करण्यास तयार होईना. घरच्यांनी एक स्थळ बघितलेलं होतं. पोलिसांचा त्रास थोडा कमी होताच शामा स्वतः उनी- उमरी नावाच्या गावी जाऊन भिवरेचं लग्न ठरवून आला. काही दिवसात तिचं लग्न झालं.